मंगळवार, ३१ मार्च, २०२०

रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जिवनातील हृदय स्पर्शी घटना





हे वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.....

         



माता रमाई आंबेडर यांची प्रकृती ठीक नव्हती बाबासाहेब परदेशात जाणार होते. माता रमाई यांना क्षय रोग हा आजार जडला होता
रमाईची तब्बेत बरी व्हावी म्हणून डॉ. नी वातावरणात बदल करण्यास सांगितले होते. म्हणून बाबासाहेबांनी माता रमाई ला वराळे मामा याच्याकडे जाण्यास सांगितले . वराळे मामा मुलांचे वसतिगृह चालवत होते. बाबासाहेबांना वाटले वसतिगृहातील मुलांना पाहून त्यांना बर वाटेल . रमाई वराळे मामाच्या वसतिगृहात पोहचल्या पण तिथे त्यांना भयाण शांतता वाटली मुलांचा आवाज ऐकू येत नव्हता . न राहून रमाईनी वराळे मामा ला विचारले .
मामा हे मुलांचे वसतिगृह आहे ना वराळे मामा हो म्हणाले, मग इथे मुलांचा किलबिलाट ऐकू येत नाही. मुले खेळताना बागडताना दिसत नाहीत . त्यावर वराळे मामा म्हणाले काय सांगू शासनाचा निधी येण्यासाठी दोन दिवसात येईल , पण वसतिगृहात मुठभर अन्न नाही
आज तर मझ्या घरची चूल देखील पेटली नाही. हे ऐकुन त्या स्तब्ध झाल्या त्यांचे डोळे पाणावले होते. 


दशा पाहुनी त्या भुकेल्या जीवाची 
दागिने रमान मोडीले सोन्याची

त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या काढून वराळे मामाकडे दिल्या पण वराळे मामा नकार देऊ लागले बाबासाहेब काय म्हणतील नका तुम्ही या बांगड्या रहुद्या मी त्यांना काय सांगायचं ते सांगेल , मुलांपेक्षा मला सोन नान मोठ नाही या मुलाची भूक भागेल यातच माझे समाधान आहे. तुम्ही या बांगड्या घेऊन जा आणि मुलांच्या जेवणाच बघा.
रमाईंनी शेन गोवऱ्या थापून आपल्या संसाराचा गाडा चालवला , खूप काबाड कष्ट केले पण त्या भुकेल्या मुलांना पाहून स्वतः चे सोन्याचे
दागिने काही विचार न करता काढून दिले. त्या भुकेले ते चिमुकले जीव
तृप्त झाले होते त्या मुलांचा किलबिलाट ऐकू न त्यांना खूप समाधान वाटले
जेव्हा त्या तेथून परत घरी निघतात , तेव्हा सर्व मुले तिथे जमतात आणि त्यांना विचारतात आम्ही तुम्हाला आई म्हटल तर चालेल का त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते . पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाकडे बघत त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि सर्व मुलांच्या डोळ्यातून अश्रु आले. तेव्हा पासून त्यांना आई रमाई म्हणू लागले.



कीर्ती तुझी आई झाली ठाई ठाई
रमाई ची झाली माता रमाई. 


आई तुम्हास त्रीवार अभिवादन.....

1 टिप्पणी:

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट